रेऊ कथास्पर्धा २०२५ । संवेदनशील, सर्जनशील आणि नवोदित लेखकांना लिहितं करण्यासाठी ...

मागील २० वर्षांपासून 'मिळून साऱ्याजणी' आणि का.स.वाणी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने 'रेऊ कथा स्पर्धा' घेतली जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ही स्पर्धा जाहीर करत आहोत. का.स.वाणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिवंगत डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या आजीचे नाव 'रेऊ' होते. डॉ.वाणींचे आपल्या आजीशी खूप जिव्हाळ्याचे नाते होते. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील, देशातील आणि देशाबाहेरील कथालेखकांपर्यंत पोहचावं आणि नव्या लेखकांचा शोध घ्यावा हा या कथास्पर्धेचा मूळ हेतू आहे. ही स्पर्धा 'ती' आणि 'तो' या पलीकडचे सर्व 'ते' या सर्वांसाठी खुली आहे.
स्पर्धेसाठीचे नियम -
- स्पर्धकांचा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला नसावा.
- कथा पूर्णपणे स्वतंत्र हवी आणि स्पर्धेसाठी कथेची मूळ प्रत पाठवावी.
- हस्तलिखित परत पाठवणे शक्य नसल्याने कथेची छायाप्रत स्वतःजवळ ठेवावी.
- कथा फुलस्केपवर पुरेसा समास सोडून कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरात लिहिलेली किंवा टाईप केलेली असावी. तसेच, पाकिटावर 'रेऊ कथा स्पर्धा' असा उल्लेख करावा.
- कथा इमेलनेही पाठवता येईल. शक्यतो युनिकोडमध्ये टाईप करून पाठवावी.
- कथा जास्तीत जास्त ३००० शब्दापर्यंत असावी.
- स्पर्धेबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. संपादकांचा निर्णय अंतिम राहील.
- बक्षीसपात्र कथा 'मिळून साऱ्याजणी' मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील, या कथांना वेगळे मानधन मिळणार नाही.
- कथेच्या सुरुवातीच्या पानावर स्वतःचे नाव, पत्ता व दूरध्वनी किंवा मोबाइल क्रमांक लिहावा.
- कथा १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आमच्याकडे पोचाव्यात. स्पर्धेचा निकाल जानेवारी २०२६ च्या अंकात जाहीर केला जाईल.
- ज्यांना स्पर्धेचा निर्णय समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी कथेसोबत रु.१००/- ची मनीऑर्डर केली तर जानेवारी २०२६ चा अंक त्यांच्या पत्त्यावर स्वतंत्रपणे रवाना केली जाईल.
- पाच उत्कृष्ट कथांची निवड केली जाईल. निवड केलेल्या कथांना प्रत्येकी रु.२५००/- पारितोषिक देण्यात येईल.
स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि बक्षीसाचे मानकरी व्हा!
कथा पाठवण्याचा पत्ता : 'मिळून साऱ्याजणी', फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, नचिकेत को-ऑप. हौ.सोसायटी, प्रभात रोड, गल्ली नं. ४, एरंडवणा, पुणे ४११००४ संपर्क नं. ८००७८१४००५ इमेल - sryajani@gmail.com